Saturday 15 December 2018

फिरुनी पुन्हा जन्मेनं मी

#अलक

आज खूप दिवसांनी ती इतकी आनंदित आणि relax मूड मधे होती. मधली काही वर्षे तिच्यासाठी खूपचं कठीण गेली होती.
तिने सावरु म्हणता काहीचं सावरले जात नव्हते. मोताच्या सरातीलं मोती सर तुटल्याने जसे अलगद ओघळतातं तसे एक एक क्षण तिच्या हातूनं निसटतचं गेले होते.
तिला आज का कोणासं ठाऊक तिला पाच सात वर्षापूर्वीची आठवण होतं होती. तेव्हा ती कशी बिधास्त, confident,रोखठोक अन् स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी ...
पण अचानक तो तिच्या आयुष्यात आला अन् सारचं पालटून गेलं. राजबिंडा पिळदार शरीरयष्टी चा तो एका daily soup मधे तिचा प्रियकर होता. त्याच्याबरोबर काम करताना सगळेचं म्हणायचे यांची chemistry खूप छान जुळलेली दिसते screen वर आणि मग हिचं chemistry on screen ची off screen कधी झाली हे तिचे तिलाचं समजले नाही. पण भानावर आली तेव्हा खूप उशीर झाला होता लोक तिला सांगत होते की त्याची अन् तुझी जातकुळी चं वेगळी आहे. कितीतरी जुन्या जाणत्या लोकांनी तिला समजवायचा प्रयत्न केला पण व्यर्थच...
अखेर तिने त्याच्याबरोबर living मधे राहण्याचा निर्णय घेतला.आई वडिलांना हे न पटल्याने तिला तसे माहेर पारखे झाले तिला त्याची पर्वाचं नव्हती ती एका वेगळ्याचं धुंदीत होती.
ज्या daily soup ने हे सारे घडले तो एक सहा महिन्यात संपला. तिला नवीन offers आल्या पण तो मात्र बेकार पडला . अन् empty minds devil's workshop अशी चं त्याची गत झाली तो तिच्यावर संशय घेऊ लागला त्यातचं तिला मातृत्वाची चाहूल लागली तिने त्याच्यामागे आपण कोर्ट मँरेज करुया असा लकडा लावला पण त्याला अडकण्यातं interest नव्हता म्हणून त्याने तिला abortion चा सल्ला दिला.  तिला आता तो खरा कळला होता पण त्याला खूप उशीर झाला होता.त्याचा उत्कृष्ट सल्ला तिला मान्य नव्हता पण नियतीच्या मनात वेगळेचं होते. तिचं miscarriage झाले अन् ती सैरभैर झाली. एक महिनाभर तिने कामही बंद केले अन् जनसंपर्क ही टाळला. परंतु काम नाही केले तर खाणारं काय मग तिने परत काम चालू केले त्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला येतील त्या offers स्वीकारतं गेली अन् स्वतःला कामातं झोकून दिलं जुन्या आठवणी न येण्यासाठी..
अन् आज तिला तिच्या एका नाटकातल्या भूमिकेसाठी सर्वोकृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळाला होता. तिला तो wish करायला आला म्हणाला झालं गेलं विसरुन जाऊन आपण परत friends होऊया. पण आज ती खूपचं confident होती अगदी पूर्वीसारखी त्यामुळे म्हणाली thanks but it's too late we can't to be friends anymore sorry...
आणि त्यासमोरुनं निघून गेली परत नियतीने दिलेल्या या second innings आनंद लुटण्यासाठी....

मृणाल वाळिंबे

Friday 30 November 2018

बोलावसं वाटलं कधी

बोलावसं वाटलं कधी,
नक्कीच व्हावं व्यक्त...
माणुस मात्र असावा,
अगदी जवळचा फक्त....!!
प्रेम करावं कुणावर,
त्याला सीमाच नसावी....
भावनाच इतकी गोडं,
जी अखंड जपावी...!!
रागही आलाच कधी,
तोही असावा लटका...
फार काळ टिकु नये,
असावा एखादं घटका....!!
शब्दाने शब्द वाढू नये,
कधी ताणू नये जास्त...
बोलून मिटवावं सारं,
हेच सगळ्यात रास्त...!!
कधी लागु देऊ नये,
अबोल्याचं कोंदण...
झालाचं जर कधी,
चुकून एखादं भांडण...!!
मनाने होऊ नये
कधी दूर
जरी असेल काही सल..!!
होऊन जावे  इतके
एकसंध
की होताच येणार
नाही  कधी विलग..!!
असेच जगावे अलवार
अळवावरच्या पाण्यासारखे
अन् करावा सोहळा
येणाऱ्या क्षणांचा
लुटावा आनंद मनमुराद
जगण्याचा...!!

मृणाल वाळिंबे

Saturday 24 November 2018

विजोड जोडपी

# विजोड जोडपी

मधे  मैत्रिणीच्या मुलीसाठी वर संशोधन चालू होते. अर्थातच तिने आम्हा सगळ्या मैत्रिणींना सांगितले की तिच्या (मुलीच्या)काय काय अटी आहेत ते.
तेव्हा ती म्हणाली मुलगी म्हणते मला विजोड नवरा नको.
मला ऐकून नवल वाटले कसं काय एका भेटीत ही मुलगी ठरवणार जोड का विजोड ते. आणि मुळात विजोड कशाला म्हणतात ते कळते का हिला.
पण काय करणार नवीन पिढी! आई वडिलांनीचं डोक्यावर चढवलेली खूप हुशार म्हणून मेरीटने ऍडमिशन मिळवली हो आता लगेचच नोकरी चं starting 45k चं package मिळालं एक सहा महिन्यात US ला जाणार बघा इति आई.
इतकं मिरवलं या बाईने आणि आता डोक्याला हात लावून बसलीय.
मुलीची मतं पराकोटीची पक्की झालीयेत ती काही केल्या बधत नाही. प्रत्येक मुलात खोटं काढते अन् विजोड नकोचं टुमणं लावते.
हे सारे पाहून मन विष्षण होते. काय त्या आई बापांची चूक?
 मुलगी हुशार म्हणून तिचं कौतुक केलं हे चुकलं का छान नोकरी म्हणून तिला प्रोत्साहन दिलं हे चूकलं
खर तरं तिला ती जे विजोड म्हणते त्याचा अर्थचं कळत नाही.
आपली जी जुनी पिढी म्हणजे आजी आजोबा मंडळी त्यांच्या वेळी तर आई वडील सांगतिलं त्याच्या गळ्यात मुलींना माळ घालावी लागे. घरात खंडीभर माणसांचा राबता असे अशात नव ऱ्याच्या अन् आपल्या आवडी निवडी जुळतात का हे बघायला वेळचं नसे.
कुणा बाईला फुलांची कोण आवड  पण नवऱ्याच्या मते चांगल्या बायका डोक्यात अशी सारखी फुले माळत नाहीत. बाई गप्प पण म्हणून काही बिचारी संसार सोडत नव्हती.
थोड्याफार adjustment मधेचं खरी मजा असते प्रत्येक वेळा नवऱ्याने बायको पुढे गुडघे टेकवले पाहिजे असं नाही काही किंवा बाईने नवऱ्यापुढे नाक घासावे असं ही नाही. पण एक नक्की संसारातल्या छोट्याश्या कुरबुरी त ही वेगळचं thrill असतं.
विजोड पणा काय हो जरी आवडी निवडी सवयी नाही जुळल्या तरी एकमेकांच्या आवडी निवडी तरं मोठ्या मनानं जपता येतात ना अन् सवयींच असं असतं की कोणीचं सर्वगुणसंपन्न नसतो त्यामुळे आपल्यातही काही वाईट सवयी असतात ना मग दुसऱ्या च्याचं सवयी highlight करण्यात कसली आहे मजा.
खरं तर ब्रम्हदेवाने बऱ्याचश्या जोड्या या विजोड चं बनवलेल्या असतात कारणं शास्त्रीय दृष्ट्या सुध्दा चुंबकाचे दोन विरुध्द ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात आणि त्याविरुद्ध दोन सारखे ध्रुव एकमेकांपासून बाजूला फेकले जातात.
म्हणूनच विजोड जरी असली जोडपी तरीही त्यांचे संसारही छान होतात.
शेवटी महत्त्वाचे काय मनाच्या तारा एकदा जुळल्या की त्यातून छान प्रेमरुपी सुर बाहेर पडून संसाररुपी गाण्याची धून सर्वदूर पसरत राहते.

मृणाल वाळिंबे

Tuesday 13 November 2018

बालपण

भातुकलीची साथ होती
कागदाची नाव होती
पाण्याने साठलेल्या डबक्याचा
किनारा  होता
मैत्रिणींची संगत होती
खेळण्याची मस्ती होती
मन हे वेडे होते
चिऊ काऊच्या गोष्टीत
रमत होते
कल्पनेच्या दुनियेतच
जगत होते
ना उद्याची चिंता
ना कसली ददात
ना कसली हाव
ना कसला ध्यास
होता तो फक्त
छान निर्व्याज  निर्मळ
भोळा असा तो बाळपणीचा काळ
कुठे आलो आता आपण
या बाजारी अन् समजुतदारीच्या
दुनियेत
बालपण गेले पार हरवून

मृणाल वाळिंबे

Friday 12 October 2018

आज पहाटे फिरायला बाहेर पडले. सर्वत्र धुक्याची चादर पसरल्यासारखी वाटत होती.रस्ता अगदीच धुसर दिसत होता.त्या धुक्याने एक छान गोष्ट शिकवली समोरचा रस्ता दिसत नसेल तर जसे जसे पुढे जाल तसं तसा रस्ता  दिसू लागतो जीवनाचं असचं असतं रस्ता सापडत नसेल तर दूरदृष्टीने प्रयत्न करणं व्यर्थ असते हळूहळू पाऊल टाकत पुढे सरकत जाल तर रस्ता आपोआप मोकळा होत जाऊन आपसूक मार्ग सापडतो.किती मोठे तत्वज्ञान ! नेहमी आपण धुक्याने दिसत नाही म्हणून अडून राहतो त्याच धुक्याला खूपच दूषण देत राहतो परंतु निसर्गातील प्रत्येक बदल माणसाला नवनवीन जीवनाचे पैलू दाखवत असतो. फक्त आपण त्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज असते.

शुभ्र धुक्याने मज
पुरतेच वेढले
डोळस असून मज
चाचपडावयास लावले
मंद गती करुन मज
सामोऱ्या रस्त्याचे ज्ञान झाले
धुक्याने मज
जीवनाचे गणित शिकवले
कितीही असू दे मार्ग धुसर
 दुडक्या गतीने टाक पाऊल
मगच होईल रस्ता मोकळा
गवसेल तुस,
 तुजा असा मार्ग वेगळा
तुजा असा मार्ग वेगळा

मृणाल वाळिंबे

Friday 5 October 2018

सध्याच्या गतिमान जगात तसे तर कुणालाच कुणाकडे बघायला वेळ नाही. प्रत्येक जण इतका busy असतो की झोपेतून उठून रात्री झोपस्तवर काय कामं करायची याची एक यादी डोक्यात घोळत असते. त्यामुळे अचानक कोणी तरी कसलेतरी आमंत्रण किंवा इतर काही काम सांगितले की मनुष्य गोंधळात पडतो आणि त्याची चिडचिड सुरू होते. त्या वैतागातूनच एक statement बाहेर येऊ लागते मला वेळचं नाही मी किती busy आहे मला माझाच विचार करायला वेळ नाही वगैरे वगैरे.. आमची आजी लहानपणी म्हणायची "अग बायांनो दिवस कधी मोठा होत नसतो आपणच पहाटे उठावं म्हणजे सगळं बेस होत असतं" आजकाल हे आजीचे शब्द सारखेच कानात घुमतात खर तरं आमची आजी आजकालच्या पिढीच्या दृष्टीने बघितलं तर एक गावंढळ अडाणी बाई पण केवढं अचाट जीवनाचं तत्वज्ञान सांगायची.
हे खरचं आहे दिवसाचे तास वाढत नाहीत कधी. त्यामुळे आपलं schedule दिवसात कसं बसवायचं ते आपणचं ठरवलं पाहिजे.
मला वेळ नाही ही सबब सोडून दिली पाहिजे. इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे मला वेळ कसा काढता येईल याचा विचार केला पाहिजे.
काम हे प्रत्येकाला असलेच पाहिजे नाही तर  त्याची परिस्थिती एखाद्या खटारा गाडीसारखी होईल नुसताच ढाचा बिनकामाचा.  काम करत रहाणे हे जिंवतपणाचे लक्षण आहे. हाताला काम हवे च नाहीतर इंग्रजी तल्या empty mind devil's workshop या म्हणीप्रमाणे परिस्थिती होईल.
काम कराच फक्त त्याबरोबरच आपल्या प्रियजनांनाही थोडासा वेळ द्या.कधीतरी एखाद्या रम्य ठिकाणी फिरायला जा बघा कशा तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात ते अन् मग परत कामाला लागा नव्या जोमाने नव्या जोशाने. तेच तेच काम करून monotonous होण्यापेक्षा कामातून थोडासा वेळ काढून स्वतः चे छंद जोपासा जे ठरेल तुमचे खरेखुरे टॉनिक.
सर्वात महत्त्वाचे आयुष्य खूप सुंदर आहे. काम करणाऱ्या व्यक्ती ला कधीच depression येत नाही म्हणून नेहमी कामात रहा. तुमच्यातल्या creative माणसाला सदैव जागे ठेवा म्हणजे तिच ठरेल तुमची खरी ओळख.
हसत रहा. दुनियेला हसवत रहा. पृथ्वीवर मनुष्य प्राणी म्हणून जन्मला आहात याचा अभिमानच बाळगा. अन् देवाचे आभार माना की त्याने एवढ्या creativity ने मनुष्यास जन्माला घातले.

मृणाल वाळिंबे
कधी कधी हे वेडं मन
काठोकाठं  भरून वाहतं
सुखदु:खाच्या अनुभवांची
आठवण साठवत रहातं
जुन्या क्षणांच्या हिंदोळ्यावर
झुलतचं रहातं
असं हे मनचं कधीतरी
मोकळं करावसं वाटतं
अन्  मगच आठवतं
एक संस्थान  मैत्री नावाचं
जिथे राग लोभ क्षणात
होतो  मोकळा
साठलेल्या दु:खाचा
जिथे होतो निचरा
मनातल्या अलवार भावनांचा
इथेच फुटतो बांध
असचं असतं हे
मैत्री चं झाड
अनामिक ओढीच्या
फांद्यांनी डवरलेलं
असं हे मैत्री चं झाड
प्रत्येकाने लावावं
जिवापलीकडे जपावं
अन्
नात्यापलीकडचं हे नातं
अलवार मनात रुजवावं

मृणाल वाळिंबे